एशिया न्यूज बीड

वक्फ बोर्डाची ट्रिब्युनलमध्ये धाव ; काळजी करू नका, साथ द्या , नोंदणी होईलच* *महाराष्ट्रातील प्रत्येक वक्फ संस्था उम्मीद पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – ना. समीर काझी*

वक्फ बोर्डाची ट्रिब्युनलमध्ये धाव ; काळजी करू नका, साथ द्या , नोंदणी होईलच*     *महाराष्ट्रातील प्रत्येक वक्फ संस्था उम्मीद पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – ना. समीर काझी*

*वक्फ बोर्डाची ट्रिब्युनलमध्ये धाव ; काळजी करू नका, साथ द्या , नोंदणी होईलच*

 

*महाराष्ट्रातील प्रत्येक वक्फ संस्था उम्मीद पोर्टलवर नोंदणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – ना. समीर काझी*

 

बीड ( प्रतिनिधी ) महाराष्ट्रातील सर्व वक्फ अंतर्गत रजिस्ट्रर्ड असलेल्या मस्जिद, दरगाह, कब्रस्तान यांची ‘उम्मीद पोर्टल’ वर नोंदणी करण्याची अंतिम मुदत आज दि.5 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश वक्फ संस्थांची नोंदणी पोर्टलवर झालेली आहे. मात्र अजूनही काही संस्था नोंदणी करण्याच्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे सबंधित संस्थांचे मुतवल्ली, ट्रस्टी आणि मुस्लिम समाजाने काळजी करू नये. घाबरून जावू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. वक्फ बोर्ड प्रत्येक संस्थांची नोंदणी करूनच घेणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तारीख वाढवून देण्यास नकार दिला असला तरी वक्फ ट्रिब्युनल ( वक्फ न्यायाधिकरण )मध्ये जाण्याची मुभा दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने ट्रिब्युनल कोर्टात धाव घेतली असून तिथे नक्कीच न्याय मिळेल आणि उम्मीद पोर्टलवर नोंदणीसाठी मुदतवाढ मिळेल असा विश्वास महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील प्रत्येक वक्फ संस्थांची नोंदणी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही ना. काझी यांनी सांगितले.

भारतात वक्फ संस्थांच्या नोंदणीत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. उम्मीद पोर्टलवर वक्फ संस्थांची नोंदणी करण्यासाठी 5 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत बीडसह महाराष्ट्रातील बहुतांश वक्फ संस्थांनी नोंदणी केली असली तरी रेकॉर्ड उपलब्ध नसणे किंवा इतर कागदपत्रा अभावी अनेकांना नोंदणी करता आली नाही. सर्व कागदपत्र एकाच वेळी उपलब्ध करण्यासाठी अडचणी येत आहेत. त्याचबरोबर उम्मीद पोर्टल वरील तांत्रिक अडचणी देखील त्यासाठी कारणीभूत ठरू लागले आहेत. उम्मीद पोर्टल वरील नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सदरील याचिका फेटाळली मात्र वक्फ ट्रिब्युनल ( वक्फ न्यायाधिकरण) मध्ये जाण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने वक्फ न्यायाधीकरणमध्ये धाव घेतली आहे. ट्रिब्युनलमध्ये नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी व्यक्त केला आहे.

*चौकट*

*महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी तर बीड जिल्ह्यातील 80 टक्के संस्थांची नोंदणी पूर्ण*

वक्स बोर्डाशी संबंधित सर्व संस्थांची नोंदणी उम्मीद पोर्टलवर करण्याचे काम गतीने झाले आहे. उम्मीद पोर्टलवरील नोंदणीत महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्यात वक्फच्या 36 हजार रजिस्ट्रर्ड संस्थांची अनेक प्रॉपर्टीज आहेत. त्यापैकी 30 हजार संस्थांची प्रॉपर्टी उम्मीद पोर्टलवर नोंदविण्यात आली आहेत. बीड जिल्ह्यात देखील संस्था नोंदणीचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. वक्फ बोर्डाचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत अतिरिक्त टेबल वाढवून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एवढेच नव्हे तर छत्रपती संभाजी नगर येथील हज हाऊसमध्ये 300 युवा तंत्रज्ञ बसवून उम्मीद पोर्टलवरील नोंदणी गतीने कशी होईल यासाठी वक्फ बोर्डाने प्रयत्न केले.दरम्यान नोंदणीची मुदत होत असली तरीही राज्यातील प्रत्येक वक्फ संस्था नोंदणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सर्वांना न्याय मिळेल असे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्यासह वक्फ बोर्डाचे सर्व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *