एशिया न्यूज बीड

जगातील सर्वोत्तम संस्कृती भारतीय संस्कृती — मोनाली नरेंद्र बोबडे यांचे विचार विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणा

जगातील सर्वोत्तम संस्कृती भारतीय संस्कृती — मोनाली नरेंद्र बोबडे यांचे विचार विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणा

जगातील सर्वोत्तम संस्कृती भारतीय संस्कृती — मोनाली नरेंद्र बोबडे यांचे विचार विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणा

प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख

 

खामगाव (प्रतिनिधी) – विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे ’परदेशातील वास्तव्य’ या विषयावर आयोजित व्याख्यान अत्यंत माहितीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण, संस्कृती, जीवनशैली आणि रोजगाराच्या संधींबद्दल सखोल माहिती मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. एस. डी. वाघ होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष निमंत्रित मोनाली नरेंद्र बोबडे आणि निसर्ग संस्थेच्या अध्यक्षा सन्माननीय नीताताई बोबडे या मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पी. डी. कायपेल्लीवार यांनी करताना आजच्या जागतिकीकरणाच्या युगात विद्यार्थ्यांना अशा मार्गदर्शन सत्रांची गरज अधिक असल्याचे स्पष्ट केले. मोनाली ताई बोबडे यांनी आपल्या प्रभावी व आकर्षक व्याख्यानातून परदेशातील जीवनशैली, शैक्षणिक प्रणाली, सांस्कृतिक मूल्ये आणि रोजगाराच्या विविध संधी याचा विस्ताराने ऊहापोह केला. त्यांनी भारतातील संस्कृती ही जगातील सर्वोत्तम संस्कृती असून भारतीय मूल्ये, परंपरा आणि सामाजिक बांधिलकी ही देशाची खरी ओळख असल्याचे अधोरेखित केले. परदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणप्रणाली, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी–मैत्रीपूर्ण वातावरण आणि आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी याबद्दल अत्यंत सोप्या व वास्तववादी भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी परदेशातील आव्हाने आणि संधी यांचा संतुलित आढावा विद्यार्थ्यांसमोर ठेवला. त्यांच्या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठीचे योग्य नियोजन, आवश्यक कौशल्ये, भाषिक प्राविण्य, शैक्षणिक तयारी आणि व्हिसा प्रक्रियेबद्दल अधिक स्पष्टता मिळाली.

 

नीताताई बोबडे यांनी आपल्या हृदयस्पर्शी भाषणातून विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव दृढ करण्याचा प्रयत्न केला. निसर्गाशी असलेले नाते हे मानवी जीवनाचे खरे बळ असल्याचे सांगून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरात किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करणे ही केवळ जबाबदारी नसून भविष्यासाठीची अमूल्य गुंतवणूक असल्याचा संदेश त्यांनी दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अर्चना कुलकर्णी यांनी करताना असा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वाचा आहे हे अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अशोक ढाले, प्रा. योगेश टापरे, प्रा. आदर्श जगताप, प्रा. श्वेता कदम, प्रा. पल्लवी खरात, डॉ. रोहिणी धरमकार, प्रा. धीरज मोहिते, प्रा. विनोद डाबरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यश मोरे यांनी सहकार्य केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जागतिक दृष्टीकोन, करिअर नियोजनाची जाणीव आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण झाला. परदेशातील संधी आणि भारतीय मूल्यांची सांगड घालून योग्य दिशा निवडण्याचा दृष्टिकोन या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाल्याचे समाधान महाविद्यालयीन वर्तुळातून व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासात मोलाची भर घालत एक स्मरणीय आणि प्रेरणादायी ठसा उमटवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *